Motivational Quotes in Marathi

Here are Motivational quotes in Marathi for you…

अनुभव हा महान शिक्षक आहे, पण तो मोबदला मात्र फार घेतो.

अन्यायापुढे मान झुकवू नका. स्वाभिमानाने लढा. फ्रत्येक जुलूमाविरुध्द योग्य मार्गाने लढा. उच्च नीचतेच्या कल्पना बदलून टाका. जातीपाती सोडून द्या.

आपण जे पेरतो तेच उगवतं.

आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतू. आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो.

आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील !

आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.

उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो, त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम नष्ट होतात.

उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.

उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही.

उषःकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.

एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.

कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा घेण्याची ज्याच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानी

कधीच न करण्यापेक्षा उशीरा का होईना केलेले बरे.

कर्माला भिणार्‍या माणसांनी जगण्यात अर्थ नाही, कर्मवीरांनी जगावं, कर्मभीरुंनी मरावं.

कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !

कुठल्याही वासनेचा क्षय करायला प्रचंड धैर्य व संयमाची गरज लागते.

केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.

खरे बोलण्याचा एक दुय्यम फायदा असा होतो की, आपण कोणाशी काय बोलतो हे लक्षात ठेवण्याची गरज नसते.

खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते, सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.

गरिबांच्या जीवनांशी एकरुप झाल्याशिवाय, समाजसेवा करण्यास पात्र होता येत नाही.

गरिबाने दिलेला पैसा एक हजार रुपयाहून अधिक मोलाचा आहे, कारण गरिब परिस्थितीतही दान करण्याची इच्छा होणे यातच त्याचे मोठेपण आहे.


जर कधी कोणी तुमच मन तोडल तर निराश होउ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे…!!! ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात…!!!

जसा गेलेला बाण परत येत नाही, तसे विचारपूर्वक केलेली गोष्ट विचारात पाडत नाही.

दुबळी माणस भूतकाळात जगत असतात आणि सामर्थ्यवान माणस भूतकाळातून शिकत असतात

व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका. आहे तो परिणाम स्वीकारा

प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा

प्रयत्न करत राहा कारण अशक्य आणि कठीण हे काही समानार्थी शब्द नाहीत

तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता

प्रयत्न करत राहा कारण सुरुवात नेहमी कठीणच असते

चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा चुकलात जरी, तरी एखादा तारा नक्कीच मिळेल

जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जी तुमचे जीवन वाचवणार आहे, तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची आवश्यकता आहे

भूतकाळ सतत डोक्यात ठेवला तर आपण आपला वर्तमानकाळ बिघडवत असतो म्हणून जुन्या,झालेल्या चुका विसरून पुन्हा नव्याने कमाल लागल पाहिजे .

आपल्या मनासारखं कधीच घडत नसतं हीच माझी ओळख असं नशीब म्हणत असतं

सुखाला सामोरे जाण्यातच खरं कौशल्य असतं त्यात जमिनीवर राहूनही आकाशात उडायच असतं

आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो.. तर ती भावना जितकी दुर्दैवी आणि दु:खदायक असते.. त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणं…. ही भावना जास्त भयंकर असते…. प्रयत्न करत रहा….

जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण, उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…

एखादी वस्तू वापरली नाही कि ती गंजते, आणि जास्त वापरली तर झिजते… काहीही झाल तरी शेवट तर ठरलेलाच आहे … मग कोणाच्याही उपयोगात न येता गाजण्यापेक्षा, इतरांच्या सुखासाठी झिजण केव्हाही उत्तमच ….!!

उत्साह हेच सर्वकाही आहे फक्त ते गिटारच्या तारांप्रमाणे नीट आवळलेले असायला हवे.

अशक्य ते शक्य करण्यात एक वेगळीच मजा आहे.

“मी ‘कोणापेक्षा ‘ चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही , पण मी ‘ कोणाचे’ तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल …!”

उठा ! जागृत व्हा !! जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका

स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत

आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी.

विचार करण्यासाठी वेळ द्या, कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे

जिवनात कितीही कठीण प्रंसग आले तरी तक्रार करु नका, कारण ”परमेश्वर ” हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण ‘भूमिका’ नेहमी उत्कृष्ट कलाकारला देतो…..!

एक माणूस २० ते २५ लोकांना दोन हाताने मारू शकत नाही पन तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करू शकतो

रस्ता सुंदर आसेल तर नक्की विचारा तो कोठे जातो, पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका त्या रयस्त्यावर चालत रहा.

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे !

एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.

आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !

जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची..!

“स्पर्धेमध्ये तोच टिकून राहतो जो परीस्थितीनुसार स्वतामध्ये बदल करतो ..कदाचित म्हणून तर वादळामध्ये मोठे-मोठे वृक्ष उन्मळून पडतात ..पण त्याच वादळात गवत मात्र टिकून राहतं ..”

ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणतही अंतर लांब वाटत नाही. एकदा विचारांची साखळी सुरु झाली कि, त्या साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो.

आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.

आयुष्य जगण्याच्या २ पध्दती: पहिली – जे आवडते ते मिळवायला शिका. दुसरी – जे मिळवले आहे तेच आवडून घ्यायला शिका.

परिस्थितीला दोष देत राहण्यापेक्षा लढण्याची जिद्द अंगी बाळगा..

वाईट घटनांशी अथवा दु:खद क्षणांशी सामना करायची तेवढी हिँमत देखिल असली पाहीजे. जर कठीण परिस्थितीशी सामना करताच येत नसेल तर आयुष्याच्या नव्या प्रकरणाला सुरवात करताच येणार नाही.

चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका..

हसता हसता सामोरे जा आयुष्याला तरच घडवू शकाल भविष्याला कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही!!

खरी श्रीमंती शरीराची , बुद्धीची आणि मनाची

एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.

स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही. तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा पण जगाने तुमच्याकडे पहावं म्हणून नव्हे तर… त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून..

” तुमच्या स्वप्नांना कधीच सांगु नका कि तुम्हाला अडचणी आहेत ते , पण तुमच्या अडचणीना हे नक्की सांगा की , तुमची स्वप्ने किती मोठी आहेत ते “

ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो.

हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला.

Leave a Comment